HW News Marathi
महाराष्ट्र

उदय सामंतांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत भेट, निलेश राणेंचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग | शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच, निलेश राणे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. ‘देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.

 

देवेंद्र फडणवीसांचा कोकण दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा केला. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला होता. “मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?” असा सवाल करतानाच “गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत” अशी टीका फडणवीस यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही….”, पंतप्रधान मोदी!

News Desk

‘माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ’,मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स!

News Desk

धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केलं लक्ष्मीपूजन 

News Desk