HW News Marathi
महाराष्ट्र

आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू – उदय सामंत

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय दिला आहे. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे, हे राज्य सरकारचे धोरण होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

यावेळी उदय सामंत यांनी म्हटले की, विद्यार्थी, पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आम्हाला परीक्षा कशा घ्यायच्या यादृष्टीने पावले उचलावी लागतील. विद्यार्थी आरोग्यहित लक्षात घेता मी सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन कुलगुरु आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही शिवसेनेला संपवू शकत नाही, हा डाव तुमच्यावरच उलटेल! – संजय राऊत

Aprna

मुंबई महानगरपालिकेला माझा सलाम –  जावेद अख्तर

News Desk

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

News Desk