HW News Marathi
राजकारण

“क्रिकेटच्या ज्ञानामुळे राजकीय ज्ञान वाढले”- उदय सामंत

ठाणे | येऊर येथे ग्लोडन स्वान कंट्री क्लब नावाने क्रिकेटसाठी जागतिक दर्जाचे इनडोअर टर्फ सुरु करण्यात आले आहे. या टर्फच्या उद्घाटनासाठी मंत्री उदय सामंत आज ठाण्यात आले होते. यावेळी उद्घटनाला त्यांच्यासोबत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. “येऊर येथील इनडोअर क्रिकेट तर्फे जे स्पीच तयार केले आहे ते उत्तम आहे. याचा फायदा मुंबईसह इतरांना देखील होईल. मी कॉलेज जीवनापासून क्रिकेट खेळत आलो आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये खेळत आलो. त्यामुळे त्या बॉलिंगचा आणि बॅटिंगचा उपयोग राजकारणात देखील होतो. लूज बॉलवर कशा पद्धतीने सिक्सर मारला पाहिजे हे मला क्रिकेटमध्ये कळत होते. तसेच कुणाला कोणत्या चेंडूवर बोल्ड करायचे ते क्रिकेटमध्ये समजायचे. त्याचाच उपयोग आम्हाला राजकारणातही होतोय. क्रिकेट खेळतच आम्ही राजकारणात आलो आहोत. क्रिकेटच्या ज्ञानामुळे आमचे राजकीय ज्ञान वाढले”, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

मात्र नानार हा विषय आमच्यासाठी संपला आहे

“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत 50 टक्केच्या आत आरक्षण देण्यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आहे. त्याचे विस्तार वृत्तांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन बुजबळ यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे काल कोकणासाठी 3 हजार 607 कोटी रुपय हे 4 वर्षांसाठी नैसर्गिक आपत्तीसाठी मंजूर केले आहेत. ती देखील समाधानाची बाब आहे”, असं उदय सामंत म्हणाले. “मी त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहे. नानारच्या बाबतीतील विषय कधीच संपला आहे. परंतु त्यावेळी शिवसेनेची भूमिका जी होती ती स्थानिक लोकांना जे आवश्यक असेल त्याठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहणार आहेत. मात्र नानार हा विषय आमच्यासाठी संपला आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांनी कोरोना संकट काळात देखील चांगले काम केले आहे. देशाच्या पातळीवर उद्धव ठाकरे यांचा क्रमांक दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ सुटलं आहे. उद्याच्या दौऱ्यामध्ये मी देखील असेल. शंख पिठाचे उद्घाटन देखील उद्याच्या मुहूर्तावर औरंगाबादेतील पैठणमध्ये असणार आहे. विरोधकांनी वर्षानुवर्ष विरोधच करत राहावे. विरोधी पक्ष म्हणून विरोधी बकावरच बसावे. यासाठी माझ्याकडून त्यांना मनापासून शुभेच्छा”, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

News Desk

राज्यातील नेत्यांनी विजयाबद्दल केले आहेत ‘हे’ दावे

News Desk

हनुमानाची जात सांगणे पडणार महागात

News Desk