HW News Marathi
महाराष्ट्र

किनगाव येथील अपघाताची केंद्र आणि राज्य सरकारकडून दखल, मृत आणि जखमींना जाहीर केली आर्थिक मदत

जळगाव | पपई भरून येणारी आयशर यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धुळे येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

यात आभोडा येथील १२, केऱ्हाळा येथील २ आणि रावेर येथील २ असे १६ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर ५ गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्त झालेल्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही आर्थिक मदत जाहीर

किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.

पंतप्रधानांनीही घेतली दखल

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड मंगळवारी सहकुटुंब पोहरादेवीत येणार, पत्रकार परिषद घेणार?

News Desk

MPSCExam : विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या, विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन

News Desk

राजकारणातील वाद कुठे खरे असतात?- बच्चू कडू

News Desk