HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान होण्याएवढी उद्धव ठाकरेंची ताकद नाही !

नवी दिल्ली | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी शुभेच्छा देताना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका देखील केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये ‘सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा’ या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला. ‘सामना’च्या याच अग्रलेखावर रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांची ताकद पंतप्रधान होण्याएवढी अजिबात नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणे अशक्य आहे”, अशी बोचरी टीका रामदास आठवलेंनी केली आहे. त्याचप्रमाणे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. आज ते आमच्यासोबत नाहीत. मात्र, जर te आमच्यात असते तर आनंद झाला असता”, अशी टीकाही रामदास आठवलेंनी यावेळी केली.
“उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, पंतप्रधान होणे सोपे नाही. त्यासाठी पक्ष संपूर्ण देशभरात पोहोचला पाहिजे. १८ लोकांवर पंतप्रधान होणे अशक्य आहे”, असे रामदास आठवेल यांनी म्हटले आहे. यापूर्वी रामदास आठवलेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना एक ऑफर दिली होती. “राष्ट्रवादीच्या हितासाठी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भविष्यासाठी शरद पवारांनी शिवसेना सोडून पंतप्रधान मोदींना साथ द्यायला पाहिजे. अनेक वेळा शरद पवार पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असतात. त्यामुळे, शरद पवार यांनी अधिक काळ शिवसेनेसोबत न थांबता देशाच्या राजकारणात सक्रिय झाले पाहिजे,” असे रामदास आठवलेंनी म्हटले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे

News Desk

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

News Desk

श्रीलंकेत बॉम्बस्फोटाचे सत्र सुरूच, पुगोडा शहरात स्फोट

News Desk