HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला! – रवी राणा

मुंबई | उद्धव ठाकरेंना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे मातोश्री या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्ये उद्या (२३ एप्रिल) हनुमान चालिसा पठण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्ये आज (२२ एप्रिल) एक दिवस आधीच मुंबई आले. राणा दाम्पत्ये गनिमी कावा करत मुंबईत दाखल झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्या मातोश्रीवर जाणार असल्याची घोषणा केली. 

रवी राणा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. आणि बाळासाहेबांनी आमच्यासोबत एक वेळा नव्हे तर शंभर वेळा हनुमान चालिसा पठण केले असते. सध्या शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला आहे. या याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार आहे. यावेळी पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा सुव्यवस्थेचे पालन करणार आहोत. आमच्यामुळे  मुंबईकरांना कुठल्याही त्रास देणार नाही, असे त्यांनी म्हटले. 

“आगोदर शिवसैनिकांनी आम्हाला म्हटले की, मुंबईत पाय टाकून दाखवा. ज्या पायावर आला तर त्या पायांनी परत जाऊ देणार नाही. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांच्या पक्षांनी आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीसाठी वापर करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था बिघाडण्याचे काम शिवसैनिक करत आहेत. या सर्वांना आम्ही सांगतो की, जर हनुमान चालिसा पठण केले नाही तरी तुम्ही आणि आम्ही हनुमान चालिसा वाचन करु, आम्ही तुमचे स्वागत करू,” असे शब्द मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी बोलायला हवे होते, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी निर्णय घेतले, तर बिघडले कुठे?

News Desk

प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका!

News Desk

“नारायण राणे नारळासारखे आहेत”- चंद्रकांत पाटील

News Desk