HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली ‘नारायण भंडारी’ गोष्ट, विरोधकांचा उडाला गोंधळ

मुंबई | राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३ मार्च) विरोधकांवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्रावरून एक किस्सा ऐकवून विरोधकांची भंबरी उडवली आहे. त्यामुळे विरोधकांचा चांगलाच तिळपापड झाला आणि विधानसभेत एकच गोंधळ सुरू झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा कुणीतरी ऐकेरी उल्लेख केल्याने त्याला शिवसेनेने जोरदार आक्षेप घेताच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आसनावर उभं राहून सदस्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा पाडला आहे.

राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत उभे राहिले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या एकएका मुद्दयाचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्राचा किस्सा ऐकवला. नारायण भंडारी नावाचं एक पात्रं असतं. ते पत्रकार परिषद घेतं. पत्रकार परिषद कशासाठी घेतली असं त्याला विचारलं जातं. तेव्हा हॉस्पिटलमध्ये लाच घेतली त्याच्यावर कारवाई कराल तर याद राखा. खबरदार आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. त्यासाठीच ही प्रेस घेतली आहे, असं हा नारायण भंडारी सांगतो. असे नारायण भंडारी, माधव भंडारी गावोगावी असतात… भाजप म्हणजे नारायण भंडारी आहे… माधव काय आणि नारायण काय दोन्ही दिवेच आहेत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘नारायण भंडारी’ची गोष्ट

विरोधकांकडे पाहत आज मी तुम्हाला नारायण भंडारीची गोष्ट सांगणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ‘तुम्ही मला एका नारायण भंडारीची गोष्ट सांगितली. तोच नारायण भंडारी पुढे मोठा होतो. गाव सोडून जातो. मोठा माणूस होतो आणि एकदा स्वत:च्या गाडीनं गावाला येतो. तो गुरुजींच्या भेटीला जातो. मला ओळखलं का असं विचारतो. गुरुजी त्याचं कौतुक करतात. टीव्हीवर तुला रोज पाहतो म्हणतात. गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलणाऱ्या नारायणचं कौतुक करतात,’ अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

मी तरी तुला हे सगळं शिकवलं नाही. मग तू हे कोणाकडू शिकलास, अशी विचारणा गुरुजी करतात. त्यावर मी गुरुच बदलला. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या ठिकाणी असंच रेटून बोलावं लागत असल्याचं नारायण सांगतो. गुरुजी नारायणला जेवायला थांबण्यास सांगतात. पण नारायण म्हणतो, मला एक पत्रकार परिषद घ्यायची आहे. आता कोविड रुग्णालयात भ्रष्टाचार बाहेर काढणारी पत्रकार परिषद घेऊन आलो. आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी दुसरी पत्रकार परिषद घ्यायची असल्याचं नारायण गुरुजींना सांगतो आणि त्यांचा निरोप घेतो, अशी कथा मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यानंतर विधानसभेत एकच गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखमुख्यमंत्र्यांनी नारायण भंडारीचा किस्सा ऐकवताच भाजप नेत्यांचा तिळपापड झालेला पाहायला मिळाला होता. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी गोंधळ घातला. जोरजोरात घोषणाबाजी केली. काही सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. वाढत्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनाही आपलं भाषण थांबवावं लागलं.अनिल परब संतापलेमुख्यमंत्र्यांचा सभागृहात एकेरी उल्लेख होताच मुख्यमंत्र्यांच्या पाठी बसलेले परिवहन मंत्री अनिल परब प्रचंड संतापले. अनिल परब तात्काळ आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख नको, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या सदस्याला समज द्यावी, अशी जोरदार मागणी केली.फडणवीसांची सारवासारव आणि दिलगिरीमुख्यमंत्र्यांचा सभागृहात अवमान झाल्याचं लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लगेचच उभे राहिले आणि त्यांनी सारवासारव केली. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी मुख्यमंत्रीपद हे सन्मानीयपद आहे. त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे. तसा उल्लेख झाला असेल तर मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगत फडणवीसांनी या वादावर पडदा पाडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभारतात जसे शिखंडी होते, तसं किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत, महापौरांची गंभीर टीका

News Desk

Ruchita Chowdhary

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk