HW News Marathi
महाराष्ट्र

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती! – उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (५ जून) ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यात प्रामुख्याने भाजपसोबत युती का तुटली? सोबत पुन्हा जाणार का? अशा अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत.

गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आहे. मात्र, या काळात विरोधकांकडून सातत्याने सरकारवर निशाणा साधला गेला. भाजपाच्या नेतेमंडळींकडून वारंवार सरकार कधी पडणार याचे मुहूर्त देखील सांगितले जात होतं. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. यासंदर्भात आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे.

सरकार स्थापन करणं एक अकल्पित घटना होती!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही एक अकल्पित घटना होती असा उल्लेख केला. “तीन पक्षांचं सरकार कधी येऊ शकेल, हा माझ्याही मनात विचार नव्हता. अकल्पित असं घडलं किंवा घडवावं लागलं. यानंतर दुसरं अकल्पिक घडलं ते करोनाचं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटतो. पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही करोनामुळे प्रत्यक्ष भेटीसाठी पोहोचू शकलेलो नाही. ऑनलाईन पद्धतीनेच कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत”, असं ते म्हणाले आहेत.

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती!

दरम्यान, भाजपासोबतची तुटलेली युतीसंदर्भात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भूमिका मांडली. “आम्ही जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपासोबत देखील आमची युती २५ ते ३० वर्ष होती. तोंडदेखलं काही असेल तर ते योग्य नाही. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. आमची युतीमधून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती”, असं ते म्हणाले. “प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, ते लपवण्याचं कारण काय? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही! – मुख्यमंत्री

राज्यात सध्या सत्तेत असलेली महाविकासआघाडी किती काळ एकत्र राहील? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे? आमच्यात कुरबुरी असत्या, तर सरकार वर्ष-दीड वर्ष चाललंच नसतं. सरकार सुरू झालं, तेव्हा सरकार म्हणून सर्वात नवखा मुख्यमंत्रीच होता. या सर्व लोकांचं मला सहकार्य लाभतंय”, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं आणि फडणवीसांचं राज्य आलं”

News Desk

“माशा मारण्याची स्पर्धा दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे”, भाजपचा राष्ट्रवादीला पलटवार

News Desk

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

News Desk