HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांसोबतची भेट बंद दाराआड नव्हती, उद्धव ठाकरेंचं ‘त्या’ भेटीवर विधान

कोल्हापूर | राज्यातील भीषण पावसामुळे कोकण, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला मोठा फटका बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आधी कोकण दौरा केला होता. त्यानंतर आज (३० जुलै) कोल्हापूरात त्यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, आजच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकरांकडे फडणवीसांना भेटीचा निरोप दिला. त्यानंतर शाहापुरीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये पुराबाबत चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे पॅकेज जाहीर करणारा नाही असं म्हटलं. तसेच, फडणवीस आणि त्यांच्या भेटीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

आम्ही बंद दरवाज्याआड भेटलो नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांना मी सांगितलं थांबा मी येतोय. याचं कारण असं होतं की, मला नागरिकांच्या जीवाशी खेळ करायचा नाही. त्यासाठी जर त्यांचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या काही सूचना असतील तर त्याचंही आम्ही स्वागत करु. मी तर म्हणतो की, आम्ही भेटलो काय बोललो कारण आम्ही बंद दरवाज्याआड भेटलो नाही. कारण तिथे दरवाजेच नव्हते. पाणीच नाही तर दरवाजे काय शिल्लेक राहतायत. आम्ही खुलेआम बोललो. मी त्यांना असं सांगितलं की कायमस्वरुपाचे काही मार्ग अवलंबवायला लागतील. त्यासाठी मी तुम्हालाही मी बोलवतो मुंबईमध्ये आपण भेटू. ज्या सूचना येतील त्यावर एकमत होईल तशी चर्चा करु. महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर जे काही आपण निर्णय घेऊ त्याच्या आड कोणी येणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे!

काही दिवसाांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला. आणि यामध्ये प्रचंड नागरिकांनी आपला जीव गमावला, तर काहींना बेघर व्हावं लागले, यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणवार जीवित आणि वित्तहानी देखील झाली. कोल्हापुरात २०१९नंतर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा दिला आहे. तर यावेळी उद्धव ठाकरे असं देखिल म्हणाले की मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.

कायमस्वरूपी इलाज महत्त्वाचा

“काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. ते नाही घेतले, तर हे संकट आपली पाठ सोडणार नाही. जे काही करता येणं शक्य आहे, ते आपण करू शकतो. आत्ताच ते शक्य आहे. नदी पात्रात झालेली अतिक्रमणांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, की यापुढे आता बांधकामं करता येणार नाही. नाहीतर ब्लू लाईन, रेड लाईन या रेषा मारूच नका. मग जे व्हायचं, ते होऊ द्या. पण असं आपल्याला करता येणार नाही. त्यावर कायमस्वरूपी इलाज करणं हा महत्त्वाचा भाग आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अशा गावांचंही पुनर्वसन करावं

आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल, तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावं लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं ही बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचंही पुनर्वसन करावं लागणार आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संसर्ग: व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक

News Desk

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर आज होणार सर्वोच्च न्यायालयात फैसला

News Desk

“स्वत:ला जाणते समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही” – निलेश राणे

News Desk