HW News Marathi
महाराष्ट्र

“राणेजी, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे”- मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग | नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांना जोरदार टोले लगावले आहेत. सुरुवातीला भाषण करताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या विकासामध्ये आपण केलेल्या कामाचा उल्लेख केला. हे उल्लेख करताना त्यांनी शिवसेनेला अनेक टोले देखील लगावले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांना अनेक टोले लगावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, नारायण राणेजी, तुम्ही म्हणालात की, बाळासाहेबांना खोटं बोललेलं आवडायचं नाही. हे खरंय मात्र, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना त्यावेळी काढून टाकलं होतं, हेही लक्षात असुदे. लघु का असेना , मोठं का असेना एक मोठं खातं तुमच्याकडे आलंय. त्याचा वापर महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही कराल, अशी आशा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दोघांनीही एकमेकांना जोरदार टोले लगावले

आज सिंधुदुर्ग विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ते दोघेही काय बोलतात याकडेही जनतेचं लक्ष लागून राहिलेलं होतं. यावेळी नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांना जोरदार टोले लगावले आहेत. सुरुवातीला भाषण करताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या विकासामध्ये आपण केलेल्या कामाचा उल्लेख केला. हे उल्लेख करताना त्यांनी शिवसेनेला अनेक टोले देखील लगावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, पवारांचा मोदींना टोला

News Desk

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर; उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल

Aprna

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk