HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार चालवताना अडचणी येत आहेत, मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे?

मुंबई | सरकार चालवताना अडचणी येत आहेत, असं महत्त्वाचं आणि सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये अनेक मुद्द्यांवरून धुसफूस तसेच मतांतर पाहायला मिळत आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना रंगला आहे. कालच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून, ज्यांना औरंगजेब प्रिय असेल, त्यांना साष्टांग दंडवत, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे..

तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. ‘मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’ असा प्रश्न थोरात यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण

News Desk

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही! – शंभूराज देसाई

Aprna

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

swarit