HW News Marathi
महाराष्ट्र

“ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही रांगतोय का? – मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला पलटवार

मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एका महिन्यात पडेल असा दावा वारंवार विरोधीपक्ष करत होता यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. ‘ सरकार पाडायच्या गोष्टी करता आधी चालवून तर दाखवा’, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या आव्हानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. ‘चालवून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही काय रांगतोय का?’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी कुटुंब नसून लिव्ह अन रिलेशनशीपमध्ये आहे. यांच्यात विसंवाद आहे, कसल्याही प्रकारचा ताळमेळ नाही. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी वर्तवली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

“ते म्हणतात सरकार चालून तर दाखवा म्हणजे आत्ता आम्ही रांगतोय का?, देशात सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आलं ते उगीच आलं का?” असा पलटवार त्यांनी केला आहे.

दरम्यान, “हे सरकार मी एकटा चालवत नाही. माझे सर्व सहकारी सक्षम आहेत. आम्ही तिन्ही पक्षांचे सहकारी मिळून हे सरकार चालवतो आहे. त्यामुळे राज्याच्या विरोधी पक्षाने सरकार चालण्याची काळजी करू नये”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनीच विरोधी पक्षाला उलट उत्तर दिल्याने राजकारण आता पुढे कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१ आणि २ डिसेंबर महाराष्ट्रभरात महावितरण कार्यालयासमोर निदर्शने व ८ डिसेंबरला मुंबईवर मराठ्यांचा वाहनमार्च 

News Desk

“चित्रा ‘वाघ’ची वाघीण का बनली?”, माजी IPSअधिकारी म्हणतात…  

News Desk

अमृता फडणवीसांचे टिकाकरांना सडेतोड उत्तर…! म्हणाल्या…

News Desk