HW News Marathi
महाराष्ट्र

उजनी पाणीसंघर्ष मिटला ! उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा निर्णयच रद्द

मुंबई । सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी आहे. सोलापूरच्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याच्या सिंचन योजनेसाठी ५ टीएमसी पाणी मिळाणार नाही, असे आता राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आहे. सरकारने तसे स्पष्ट आदेश आज (२७ मे) दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी खरंतर उजनी धरणातून इंदापूरसाठी ५ टीएमसी पाणी देण्याला मंजुरी मिळाली होती. मात्र, सोलापूरकर आणि जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून ह्याला विरोध झाला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला. भरणे यांनी वारंवार आश्वस्त करूनही हे प्रकरण अधिकच पेटत असल्याने अखेर शासनाने इंदापूरला ५ टीएमसी पाणी न देण्याचे आदेश पत्र काढले आहे.

जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, सोलापूरकरांचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी या प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्या शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबतचा पाठपुरावा केल्याची माहिती मिळते. आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा आदेश काढला आहे. दरम्यान, सोलापूरकरांसाठी हा विजय असला तरी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का आहे.

नेमका वाद काय ?

सांडपाण्याच्या नावाखाली सोलापूरच्या उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय सरकारने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याच हस्तक्षेपामुळेच घेतला गेला असून हे पाणी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सोलापूरकरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी भाजपचे नेते सरकारविरोधात आक्रमक झालेच पण काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असेही चित्र पाहायला मिळाले. कारण, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी “प्राण जाए पर पानी न जाए” म्हणत आक्रमक इशारा दिला होता.

दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण

दत्तात्रय भरणे याबाबत वारंवार असे स्पष्टीकरणही देत होते की, “उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला तर मी माझी आमदारकी आणि मंत्रीपद सोडून राजकारणातून संन्यास घेईन.” मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

जयंत पाटलांच्या निर्णयामुळे दत्तात्रय भरणेंना धक्का

काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी, मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुण्यातून उजनी धरणात वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजेनेद्वारे इंदापूर तालुक्याला देण्याच्या तत्वतः निर्णय रद्द करण्याची घोषणा केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी वारीसाठी पुणे विभागातून ५३० बसेसची सेवा  

News Desk

खुशखबर…एका दिवसात मिळणार पॅनकार्ड

News Desk

पक्षाच्या अध्यक्षांनी जर परवानगी दिली, तर नावानिशी पुरावे जनतेसमोर मांडेन!

News Desk