HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचे अश्रू समजून घ्या विजय वडेट्टीवारांचं विधान!

औरंगाबाद। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची ओबीसी म्हणून पक्षात उपेक्षा झालीय. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

बदाम आणि खारखा आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे

औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागले तर जनतेची कामे होतात. भावाभावांमध्ये भांडण लावून सरंजमदारी टिकवण्याचे काम आजवर केले गेले. सत्यनारायणाची पूजा आम्ही केली पाहिजे. बदाम आणि खारखा आमच्याच पोरांनी खाल्ली पाहिजे. पण दोघांच्या भांडणात सर्वाधिक लाभ ठाणेदाराचा होतो, हे लक्षात घ्या, असं वडेट्टीवार म्हणाले.

सत्ता कुणाच्याही पक्षाची आली तरी पहिल्या बाकावर कोण बसतं.?

आम्ही फक्त बशा धुणारे झालो आहोत. आम्हाला भजे दिले की आम्ही त्यात खुश होतो. पण ते मटण खातायत ना. ज्यांच्यामुळे आपण मंत्री झालो त्यांच्यासाठी खापायला शिकलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं

यावेळी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याची हाकही दिली. खुर्चीचे चारही पाय हलवण्याची ताकद ओबीसी समाजात निर्माण झाली पाहिजे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत व्हावं लागतं. आमचे मुख्यमंत्री समजदार आहेत. ओबीसी हॉस्टेलला निधी मिळत नव्हता, मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बोलवून ओबीसी हॉस्टेलला निधी उपलब्ध करून दिला. ओबीसींना 2 हजार कोटी रुपये स्कॉलरशिप मिळते. मात्र फक्त 100 कोटी रुपये केंद्र सरकार देतं, असं त्यांनी सांगितलं.

ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आमच्या हक्काच्या

इंपेरिकल डाटासाठी भाजप सरकारच्या काळातही पत्र पाठवण्यात आले होते. आमचं सरकार आल्यानंतरही आम्ही केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. पण केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही. ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आमच्या हक्काच्या आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा’, मुख्यमंत्र्यांचा तळीयेतील नागरिकांना आधार….!

News Desk

‘त्या’ व्हिडीओवर महाराष्ट्र भाजपने दिले स्पष्टीकरण

swarit

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टीं

News Desk