HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

मुंबई। राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष केवळ मलई खाण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. परस्परविरोधी विचारधारेचे शिवसेना, काँग्रेस हे पक्ष कधी एकत्र येतील असा विचार कुणी केला नव्हता. भाजपसारखे संघटन कुठल्याही अन्य पक्षांकडे नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपसातील मतभेद विसरून केंद्र सरकार व महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे जनतेसमोर मांडावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

स्थानिक पातळीवरील गटबाजी बहुदा गडकरी यांनी हेरली

नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या गडकरी यांनी सोमवारी रात्री शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी गडकरी यांनी उपरोक्त सल्ला दिला.मागील महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये इतर पक्षातील नगरसेवकांना मोठय़ा प्रमाणात प्रवेश दिला गेला. त्यावरून पक्षात नवे-जुने असे गट पडले. स्थानिक पातळीवरील गटबाजी बहुदा गडकरी यांनी हेरली.त्याचा थेट संदर्भ न देता अतिशय कठीण काळात काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्याच योगदानावर आज भाजप उभा असल्याचे सांगितले. लोकसभेत पक्षाचे केवळ दोन खासदार होते. तेव्हा इतर पक्षीयांकडून टिंगलटवाळी केली जात असे. तरीदेखील भाजपचे जुने कार्यकर्ते काम करीत राहिले.

स्थानिक पातळीवरील अशा अनेकांचा त्यांनी नामोल्लेख देखील केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान स्मरणात ठेवावे, असेही सूचित केले.


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन; पूरस्थितीची आज पाहणी करणार

Aprna

औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी अडीच हजार लोकांवर गुन्हा दाखल

News Desk

परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्याची राज्यपालांची मागणी

News Desk