HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात | आरोग्यमंत्री टोपे

मुंबई। राज्यात आजपासून अर्थातच (१९जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणा सुरुवात होणार असून, शासकीय लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम आता राबविण्यात येणार आहे, तर ४५ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण हे नियमितपणे सुरू राहणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या नियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्‍चित केला असून आजपासून (१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाची मुभा दिल्यानंतर १ मेपासून पुण्यासह राज्यात १८ ते ४४ वयोगटाचेही लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, राज्याला लशीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्य शासनाने १३ मे पासून या वयोगटाचे लसीकरण तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आजपासून पुन्हा ३० ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण सुरू होत आहे.

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्व नोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यासाठी कोविन अँप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठवले आहे. संबधीत कर्मचाऱ्यांना देखील याबाबत प्रशिक्षणाचे निर्देश दिलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्ञानवापी मशिदी प्रकरणी वाराणसी न्यायालयाने सर्वेक्षण कमिशनर अजय कुमार मिश्रा यांना हटविले

Aprna

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनातून भाजपवर टीका

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

News Desk