HW News Marathi
महाराष्ट्र

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही !

नाशिक | वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी धरणग्रस्तांना दिली आहे. वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे.

धरणाच्या बांधकामासाठी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या मात्र काहींचा उपयोग झाला नाही. आजही शेतकरी अशा जमिनी कसतात. त्या शेतकऱ्यांचे म्हणणे मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतले. “वैतरणा धरणग्रस्तांच्या विषयावर महसूल, अर्थ, विधी व न्याय विभागाच्या सचिवांसह लवकरच बैठक घेऊन काही दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आता राज्यानेही एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घ्यावा”- प्रवीण दरेकर

News Desk

‘म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते…

News Desk

ED च्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार! – प्रताप सरनाईक

Aprna