HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये पावसाचं रौद्ररूप ! मुसळधार पावसात पूल गेला वाहून, अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड | महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याचे पहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.

बीड जिल्ह्यातील खळवट लिंमगाव येथील घटना भिमनाईक तांडयावर जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पावसामुळे वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच वडवणी सिंधफना नदी दुथडी भरून वाहू लागल्याने देवडी ते पात्रुड वाहतूक ठप्प झाली होती.

खळवट लिमगाव, चिंचवड, हरिश्चंद्र पिंपरी गावाच्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काहीकाळ संपर्क तुटला होता. आज झालेल्या पावसामुळे पेरणीला वेग येणार आहे. या पावसाने आनंद व्यक्त केला जात आहे. नदी नाले भरून वाहत असल्याने तलावातील पाण्याची पातळी देखील वाढले आहे.

पुढील ४ दिवस बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाच्यावतीने गावाकडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसिंचन विभागाकडून पूररेषांची नव्याने आखणी होणार – जयंत पाटील

News Desk

शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना; माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील! -शंभूराज देसाई

Aprna

पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार! – आदित्य ठाकरे

Aprna