HW News Marathi
महाराष्ट्र

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी सकाळीच देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला अखेर आज यश मिळाले आहे. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, विरोधकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे म्हटले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोदींना टोला लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

मागच्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनावरून संसदेत बोलताना, शेतकऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हणून हिणवले होते. मात्र, आज त्याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. आपला एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारने 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यावरुन, अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राने यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता, असे विरोधकांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मोदींच्या या आंदोलनजीवी टीकेवरुनच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.

पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला

“उशीरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. मोदींचं मी अभिनंदन करतो. १३ राज्याच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दारून पराभव झाला. त्यानंतर सर्वात आधी महागाईचा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाने ही आग पसरत जाईल. म्हणून हे काळे कायदे त्यांनी मागे घेतले. हे राजकीय पाऊ जरी असले तरी, त्यांचे कौतुक आहे.अस शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk

सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

Aprna

“कमवतात इथे आणि पाठवतात पाकिस्तानला”; नाव न घेता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची शाहरुखवर टीका

News Desk