HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचे दोन्ही चिरंजीव झाले आमदार

लातूर | विधानसभा निवडणुकीत लातूनमधून दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव आमदार म्हणून विधानसभेत जाणार आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख आणि लातूरमधून अमित देशमुख या दोघांचा बिनविरोधी विजयी झाला आहे. या दोघांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर तिसरा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटरवर भावनिक पोस्ट टाकली. बाबा आम्ही करून दाखवले’ अशा अर्थाचे हे ट्वीट रितेश देशमुखांनी केले आहे.

रितेशने देशमुख यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “बाबा आम्ही करून दाखवलं’ अशा अर्थाचं हे ट्वीट रितेश देशमुखांनी केलं आहे. या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन मुलं निवडणुकीच्या रिंगणात होती. त्या दोघांनाही यश मिळाल्यानंतर रितेश देशमुख यांनी ट्वीटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.” लातूरमध्ये देशमुखे घराणे गड राखणार की नाही याकडे साऱ्या राज्याचे लक्ष होते.

विलासराव देशमुखांचा मुलगा अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल ४० हजार मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. मित देशमुखांनाही ४२ हजारहूनन अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला. शैलेश लाहोटी यांना ६८ हजार ४९७ मते पडले. तर दुसरा मुलगा धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लातूर ग्रामीणची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला गेली, त्यामुळे देशमुख कुटुंबियांची लढत अजून सोपी झाली. जवळपास एक लाखांच्या विक्रमी मतांची आघाडी घेत धीरज देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन जागा आल्या आहेत, त्या दोन्ही जागा देशमुख बंधूंच्या रुपात आल्या आहेत हे विशेष.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार अन् फडणवीसांमध्ये जुंपली

News Desk

राजीव सातव यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागणार?

News Desk

“केंद्र सरकार कर्तव्यात चुकल्यानेच OBCआरक्षण रद्द झालं”

News Desk