HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावात चक्क सरपंचपदाचा केला लिलाव…!

नाशिक | राज्यातील विविध निवडणुका कायमच चर्चेचा विषय असतो. एकीकडे निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र उमराणे (देवळा) येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंचपदाचा लिलाव झाला आहे. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली १ कोटी ११ लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले आहे.

आज सकाळी बाजार समितीच्या आवारातच हा लिलाव झाल्याचे म्हटले जाते. याचा एक व्हीडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. हा लिलाव बाजार समिती जवळ रामेश्वर महाराज मंदिरात झाला. त्यात शेतकरी व शेतीशी संबंधीत व्यापार करणारेच आघाडीवर होते. सुरवातीची बोली १.११ कोटींची होती. आधी फारसे प्रतिसाद नव्हते. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यात चढाओढ सुरु झाली. कदाचीत या चढाओढीनेच ही बोली थेट २ कोटी ५ लाखांवर पोहोचली. त्यात सुनिल दत्तू देवरे यांनी बाजी मारली. एरव्ही त्यांनी थेट सरपंचपदाची निवडणूक लढविण्याची तयारी केलीच होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून ते उमेदवारी करीत होते.

अनेक ग्रामपंचायतींत अशा प्रकारे सरपंचपदाचा लिलाव करण्याची प्रथा रुढ होऊ लागली आहे. त्याची चर्चा नेहेमीच सुरु असते. मात्र त्याचा चक्क व्हिडीओ पहिल्यांदाच व्हायरल झाला आहे. उमराणे गाव राजकीयदृष्ट्या विशेष जागरुक आहे. येथे सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते आहेत. कांदा प्रश्नावरुन येथे नेहेमीच आंदोलनाच्या ठिणग्या पडत असल्याने या गावाची चर्चा होते. मात्र सरपंचपद थेट २ कोटी ५ लाखांना गेल्याने या गावाची चर्चा जास्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा; गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

Aprna

भुजबळांना राज्य सरकारविरोधात भडकवण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न ?

News Desk

मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?, भाजपचा सवाल

News Desk