HW News Marathi
महाराष्ट्र

“बीड जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट पालकमंत्री गप्प का?” विनायक मेटे

बीड | बीड येथील शिवसंग्राम कार्यालयात विनायक मेटे यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेचे बोलतांना विनायक मेटे यांनी बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबद चिंता व्यक्त करत पालकमंत्री धनंजय मुंडे वर साधला निशाणा म्हणाले कोणाच्या आशीर्वादाने चालतो जिल्ह्यात अवैध बाजार.

अतिवृष्टीत साधे पंचनामे सुद्धा करण्यात आले नाही

शेतकरयांच्या प्रश्नवर विनायक मेटे म्हणाले की,गेल्या 10 महिन्यात 200 पेक्षा जास्त बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,शासनाला तर जणांची नाही तर मनाची ही लाज वाटत नाही. या अतिवृष्टीत साधे पंचनामे सुद्धा करण्यात आले नाही, अध्यप दिवाळी अली तरी सुद्धा एक रुपयाही शेतकऱ्याच्या अकाउंट ला आलेला नाही, मुख्यमंत्री मात्र फक्त घोषणाबाजी करण्यात व्यस्त असल्याचा आरोप ही विनायक मेटे यांनी यावेळी बोलतांना केला आहे.

काका पुतण्याची युती ही जनतेला मारन्यासाठी

या सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी केली पाहिजे, काळे झेंडे लावून त्यांचा निषेध केला जाईल. सध्या डेंगू आणि चिकनगोंनिया ने बीड जिल्ह्याची सर्वच हॉस्पिटल भरले आहेत. बीड नगरपालिकेतील काका पुतण्याची युती ही जनतेला मारन्यासाठी आहे. याला सर्वस्वी जबाबदार ही नगरपालिका आहे. बीड शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याच्या वितोधात आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे. बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे, हातभट्ट्या, पत्ते क्लब, गांजा गुठका, पोलीस मुख्यालयाच्या समोर खून होत आहेत

साधं fri सुद्धा नोंदवली जात नाही,

यांच्याच संगतमताने हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. पालक मंत्री मात्र गप्प का? असा सवाल यावेळी उपस्थित केला .या मागे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय असे अवैध धंद्याचे कारखाने चालूच शकत नाही याचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा आम्हला आंदोलन करावे लागणार आहे असल्याचा इशारा यावेळी विनायक मेटे यांनी केला आहे. तर पुढे बोलतांना मेटे म्हणाले की,5 ग्राम गांजा सापडला तर संबंध देश पेटला आणि पालक मंत्र्यच्या मतदार संघात 300 किलो गांजा सापडतो आणि पालक मंत्री साधं स्टेटमेंट सुद्धा देत नाहीत. ग्रह मंत्री गप्प आहेत.असा सवाल यावेळी विनायक मेटे यांनी उपस्थित केला

बीड जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत याबाबद पोलीस प्रशासन गप्प आहे.आर्यन खान चा विषय संपला असेल तर मुख्यमंत्री महोदय यासर्वातून जर वेळ मिळाला तर तुम्ही आमच्या शेतकऱ्याकडे बघा आणि त्यांची दिवाळी गोड करा असा सवालही बोलतांना उपस्थित केला तर “उद्धवा अजब तुझे सरकार काही कळतच नाही असे ही ते म्हणले. आम्ही थोडेदिवस आणखी पाहणार आहोत आणि मग आम्ही शिवसंग्राम दिवाळी नंतर प्रचंड मोर्चा काढून निदर्शने करेल असे बोलतांना विनायक मेटे म्हनाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावात ‘कमळ’ फुललं 

swarit

बुलडाण्यात ३ कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ

News Desk

‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे’, राष्ट्रवादीने डिवचलं

News Desk