HW News Marathi
महाराष्ट्र

“बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही”, विनायक राऊतांची संतप्त भावना

मुंबई | केंद्रीय मंत्र्यांच्या जनयात्रेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनयात्रा १९ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे आधी शिवसैनिक होते, मात्र आता त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला आहे. यावर विनायक राऊत यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

राणे जिथे शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे शिवसेनेचाच विजय

“राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.

महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत

राज्यसरकारच्या कामावरून नारायण राणे त्यांना नेहमीच सुनावत असतात. यावेळेस त्यांनी राज्यसरकारचे वाभाडे काढणार असल्याचं बोले आहेत. “महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत. 16 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यांचं जे काही काम चालू आहे, राज्य ज्या पद्धतीने अधोगतीकडे नेहण्याचं काम करत आहेत. त्यावर बोलण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील लोकांना जागृत करेन. त्यातच केंद्रामध्ये महाराष्ट्राला दिलेल्या न्यायाबद्दलही माहिती देईन”, असं यावेळी राणे म्हणाले आहेत.

तसेच राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. चिपळूणसह कोकणमध्ये पुन्हा एकदा पाहणीसाठी जाणार आहे. मी कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर आमच्या मंत्र्यांनी 700 कोटी रुपयांची मदत केली. अन् मुख्यमंत्री गेल्यानंतर फक्त दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. लोकांनी ते पैसे पिंपात टाकले, उद्धव ठाकरे यांच्या नावाने ते फुगून बाहेर येतील, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे सरकारची उडवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी तसं म्हणालो नाहीच!” निधीच्या विधानावरुन अशोक चव्हाणांचा युटर्न

News Desk

संभाजीराजे, उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांची मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक

News Desk

मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा भाजपचा डाव – सचिन सावंत  

News Desk