HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

पुणे | पुणे शहराला दररोज सुमारे सोळाशे एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ साडे अकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा बैठकीत झाला आहे. पुण्यात सध्या मध्यवस्तीत दोन वेळा तर उपनगरात एक वेळा पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता पुण्यात पाणीकपात सुरु केली जाणार असून पुणेकरांकडे दिवसातून एकदाच पाणी येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि उपस्थित एकाही आमदाराने याबाबत आक्षेप किंवा विरोध नोंदवला नाही. खडकवासला धरण साखळी सोडून इतर कोठेही धरणात पुरेसे पाणी नसल्यामुळे जलसंपदा खात्याने हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले जात आहे.

पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयानंतर सर्व शहरात दिवसातून एकाच वेळी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्त सौरभ राव संध्याकाळी याबाबत पुण्यात आल्यानंतर प्रशासनाची भूमिका अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडाऱ्यातील सर्वात मोठी सायकल परेड; विद्यार्थी, गृहिणी व तरुणाईंचा उदंड प्रतिसाद

News Desk

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसासह फिरोजलाही फाशी द्या – सीबीआयची मागणी

News Desk

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार! – मुख्यमंत्री

Aprna