HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ नेत्याचे आडनाव ठाकरे नसते तर…!

नाशिक | ‘बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते. मनसे आता आहे तरी कुठे? यांच्या नेत्याचे आडनाव ठाकरे नसते.’ असा घाणाघाती हल्ला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. पाटील यांनी नाशिकमध्ये प्रभाग २६च्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंवर टीका केली.

गुलाबराव पाटील म्हणाले की, “‘बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते. मनसे आता आहे तरी कुठे? यांच्या नेत्याचे आडनाव ठाकरे नसते, तर आज कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. ठाकरे आडनाव असल्याने त्यांच्याभोवती वलय आहे”, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

यावेळी गुलाबराव पाटालांनी भाजपासह मनसेवर हल्लाबोल केला. पाटील म्हणाले की, ‘भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप निवडणुकीत फक्त पैशाचा वापर करते बाकी त्यांच्याकडे दुसरे काही नाही, असा आरोपही गुलाबराव यांनी भाजपवर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राष्ट्रवादीत चाललो’ भाजपच्या कल्याणराव काळेंनी धाडला निरोप!अजित पवारांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

News Desk

‘हनुमान चालिसा’मुळे राजद्रोहाचा गुन्हा, तर आम्ही रोज म्हणू, फडणवीसांचे राज्य सरकारला आवाहन

Aprna

“मोदी गुजरात दौऱ्यावर, फडणवीस कोकण दौऱ्यावर; मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

News Desk