HW News Marathi
महाराष्ट्र

“एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त”- विजय वडेट्टीवार

मुंबई। अभिनेत्री कंगना रानौत ही सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे होता अनेकांकडून टीका देखील केली जाते. मागच्याच आठवड्यात कंगना रानौत न एक वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा ती आता बरळली आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार देखील तिच्या या वक्तव्यावर चांगलेच संतापले आहेत. ‘एक नाची जे काही बोलतेय ते वादग्रस्त आहे. तिची लायकी नाही की महात्मा गांधींवर बोलते. असं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असं असं म्हणत वडेट्टीवार यांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतलाय, बॉलिवूड क्विन कंगना रानौत आपल्या वादग्रस्त विधानामुळे सातत्यानं चर्चेत आहे.

कंगनाचा हा वाद आणखी पेटणार

मात्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री एवढ्यावरच न थांबता पुढे देखील कंगनावर आरोपांची सरबत्ती केली. तर पुढे ते म्हणाले की,’कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता’. विजय वडेट्टीवार यांच्या सनसनाटी विधानावरून कंगनाचा हा वाद आणखी पेटणार असं चित्र सध्याच्या घडीला राज्यात निर्माण झाल आहे.

पुन्हा एकदा कंगना बरळली

वादाचा धुमाकूळ कायम ठेवत अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मंगळवारी दावा केला आहे, की सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नाही. शिवाय कंगनाने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत, दुसरा गाल अर्पण केल्याने (थापड खाल्याने) स्वातंत्र्य “भीक” मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे.रणौतने मागच्या आठवड्यात म्हटले होते की, भारताला १९४७ मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मिळालं. तोवरच पुन्हा एकदा कंगना बरळली आहे.

कंगना पोस्टमध्ये काय म्हणाली?

इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, ‘तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.’ कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, ‘जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागते, विचार करून तुमचे हिरो निवडा.’ पुढे कंगना म्हणाली, ‘गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबाना आझमी यांच्या कारचा खालापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात

swarit

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?

News Desk

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

News Desk