HW News Marathi
महाराष्ट्र

पर्यावरण आणि पर्यटन खाते मिळाल्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले…

मुंबई | महावकिसाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार सोहळ्याच्या आठवड्यापूर्वी पार पडला होता. यानंतर आज (५ जानेवारी) महाविकासआघाडीचे खातेवाटप झाले आहे. यात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन मंत्रिपद देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन आनंद व्यक्त केला आहे.

खातेवाटप झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”मला पर्यावरण आणि पर्यटन अशी आवडती खाती मिळाली, याचा मला आनंद आहे. मी आता सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्याबरोबर पर्यटनावर आपण संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभारू शकतो. सद्यपरिस्थित महाराष्ट्रात पर्यटन वाढीस वाव मिळणार आहे. गडकिल्ले, समुद्र किनारे यामुळे राज्यात पर्यटनवाढ होऊ शकते.”

दरम्यान, राज्य सरकारच्या आज झालेल्या खातेवाटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती आहेत. तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील. तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी उत्पादन निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा अभिमान! – दादाजी भुसे

Aprna

“वयाची अट असताना फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली?”,काँग्रेसचा सवाल

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा

News Desk