HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, खुद्द पवारांनीच दिलं उत्तर

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार आणि सोबतच महाविकास आघाडीतील अन्य काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती आणि या भेटीनंतर अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येतायेत, मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात मतभेद असल्याच्या देखील चर्चा मधल्या काळात सुरू होत्या मात्र, आता शरद पवार यांनी या चर्चांना थांबवलंआहे. मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टपणे शरद पवार यांनी आज (१ जूलै) डी वाय पाटील तांत्रिक कृषी विद्यापीठाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितलं आहे.

विधनासभा अध्यक्षपदाची जागा ज्या वेळेला आम्ही सरकार बनवलं, तेव्हा काँग्रेसला द्यायची ठरवलं. ती काँग्रेसचीच जागा आहे. त्याची निवडणूक घ्यायची असेल तर तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यावा. काँग्रेस जो उमेदवार देईल तो निवडावा, असं देखील पवार म्हणाले, आज (१जुलै) माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती शरद पवारांनी दिली.

“मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यात पुढील कार्यक्रम कसा गतीने करता येतील यावर बैठक झाली. आमचा आग्रह आहे की काही प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. तसंच या सरकारच्या कार्यक्रमांना आणखी गती दिली पाहिजे. या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. कसलीही राजकीय चर्चा झाली नाही,” असं देखील पवार या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी म्हणाले.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला काही घटकांचा विरोध आहे. त्यामुळे कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तसेच हे दुरुस्ती विधेयक लवकरात लवकर मांडण्यात यावे असं मत शरद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केलंय. याबरोबरच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या आंदोलनावर देखील पवारांनी चिंता व्यक्त केली आहे.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर मागील सात महिन्यांपासून आंदोलन करतायेत. त्यांची भूमिका ही संतापजनक आहे. ते उठायला देखील तयार नाहीत. तसेच आता चर्चा करायलाही तयार नाहीत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे ते उठायला तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते योग्य नाही. काल भाजपच्या लोकांनी तिथं गोंधळ घातल्याचं ऐकलं आहे.

सरकारनं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असं सांगतानाच कृषी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे. असे देखील शरद पवार या उद्घाटनाप्रसंगी म्हणाले. त्यासाठी दुरुस्ती विधेयक सरकारनं आणलं पाहिजे. ते अधिक चांगलं होईल, असं पवार म्हणाले. तसेच दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटतं, असंही त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीतली चर्चा

या उद्घाटनाप्रसंगी पत्रकार परिषदेत शरद पवारांना असही विचारण्यात आलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत कोणत्या चर्चा झाल्या यावर पवार म्हणाले या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर डीडी कडून मिळालेल्या नोटिशी वरही यावेळी विचारण्यात आलं पवारांनी नकार देत यावेळी हा प्रश्न योग्य नाही असंही सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!

News Desk

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषदेतून अमिताभ गुप्तांनी हसत काढता पाय घेतला

News Desk