HW News Marathi
महाराष्ट्र

‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात तर काहींचा तोल जातो, त्यामुळे…

सांगली। चंद्रकांत पाटील आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात, आणि आता देखील तीच प्रचिती पाहायला मिळाली. आताही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. ‘सत्ता गेली की कोण भ्रमिष्ट होतं, तर कोणाचा तोल जातो, त्यामुळे चंद्रकांत पाटलांचे यापैकी काय झालंय, याचे संशोधन कराव लागेल, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगलीमध्ये बोलत होते. ‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात. तर काहींचे तोल जातो, त्यामुळे आता चंद्रकांतदादांचा यापैकी नेमकं काय झालं याचं संशोधन करावे लागेल, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांची सारवासारव

शरद पवार यांच्या एकेरी उल्लेखाने दुखावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. तसंच शिवसेनेनंही त्यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सांगलीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अनावधानाने माझ्याकडून पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख झाला. पवारसाहेब आमचे विरोधक असले तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल अनादर नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारची भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती

Aprna

“अंगावर याल तर शिंगावर घेऊच” दादरच्या भाजप-सेना राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया

News Desk

माजी सैनिकांना घरपट्टी कर भरावा लागणार नाही, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk