HW News Marathi
देश / विदेश

“स्फोटक प्रकरणात अंबानींची तक्रार कुठे ?”, वकील असीम सरोदेंचा सवाल

पुणे | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी अॅड. असीम सरोदे यांनी आता काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. असीम सरोदे विचारतात कि, “जिलेटीन स्फोटक प्रकरणात अंबानी यांची तक्रार कुठे आहे?” याच्यापुढे बोलताना असीम सरोदे यांनी “सचिन वाझेंच्या प्रकरणात राजकारणच अधिक होत आहे”, अशी थेट टीका केली आहे. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. कायद्याचा राजकारणासाठी आपल्या सोयीनुसार वापर केला जात आहे. खरंतर NIAने राष्ट्रीय गुन्ह्याचा तपास करणे अपेक्षित आहे, असेही सरोदे यांनी यावेळी नमूद केले.

असीम सरोदे विचारतात कि, “घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणी अंबानी यांनी लेखी तक्रार केली आहे का? पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट घेतलं आहे का किंवा अंबानी यांनी त्यांचंच स्टेटमेंट दिलं आहे का? हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. ज्यांच्याविरोधात कट रचला गेलाय त्यांचे स्टेटमेंटच नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकारणच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे”, असे स्पष्ट मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे .

नार्को टेस्ट करणे कायदेशीर नाही, मागणीच चुकीची !

भाजप या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला असून भाजप नेते राम कदम यांनी या प्रकरणी नार्को टेस्टची मागणी केली आहे. त्याबाबत बोलताना असीम सरोदे म्हणतात कि, “वाझे यांची काही चूक असेल तर त्यांना शिक्षा मिळणारच. मात्र, त्यासाठी त्यांची नार्को टेस्टची मागणी काही सुमार दर्जाचे नेते करत आहेत. मुळातच, नार्को टेस्ट करणं हे बेकायदेशीर आहे. ही मागणी चुकीची आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनचा भारतीय सैन्यावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपा काढत होते काय ?

News Desk

जाणून घ्या…याआधी कधी भारतीय लष्करावर झाले दहशतवादी हल्ले

News Desk

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

News Desk