HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई | “एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. देशातील मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे आणि यात आपल्या मुख्यमंत्र्यांचे नाव नाही, या प्रश्नाव बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर निशाणा साधला. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सामनाच्या आग्रलेखासंदर्भाद आज (13 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना राज्यातील गोल्डन गँग शोधण्याचे आव्हान पत्रकारांना केले आहे.

 

देशातील मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे आणि यात आपल्या मुख्यमंत्र्यांचे नाव नाही, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “मुळात एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही. दहामध्येही नाव नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कायम, महाराष्ट्र राज्य हे कायम औद्योगिक आणि आर्थिक दृष्या एक प्रगतशिल राज्य म्हणून देशात गेणले गेले. जगात आपल्या राज्याचे महत्व होते. गेल्या सहा किंवा सात महिन्यापासून महाराष्ट्र या देशाच्या खिस गणतीमध्ये अजीबात नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच आणि चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. हे त्यासाठी कुठे तरी महाराष्ट्राचे पंख कापले जावेत. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पहावत नव्हता. त्यामुळे हे सरकार पाडून फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती या मुख्यमंत्री पदावर बसविल्यामुळे महाराष्ट्राची अदोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी जी असते, अशी ही उताराला लागलेली गाडी आहे. या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री पद म्हणजे. महाराष्ट्र जो शिखरावर निघालाल होता. तो परत खाली कोसळताना दिसतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहिल्या 10 मध्ये नाहीत. याचे वाईट वाटले पाहिजे. त्या मुंदे गटाला खास करून आणि भाजपच्या इथल्या प्रमुख लोकांना पण, त्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटल्या असत्या. हे दुर्दैव आहे. एक फार सुंदर मंत्र होते, सेनापती बापट याचे “महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडीने चाले”. आज महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालविणे, ते सोपे आहे. हे दिल्लीचे तक्थ दाखवून देते.”

 

राज्यातील गोल्डन गँग शोधन्याचे पत्रकारांना आवाहन

संजय राऊत, “ज्या गोल्डन गॅंगचे काम महाराष्ट्रात चालू आहे. त्याला सोनेरी टोळी म्हटले पाहिजे. त्या सोनेरी टोळीचे काम कश्या पद्धतीने सुरू आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर बाहेर काही ठिकाणी अनेक असे विषय आहे. ते हळूहळू मी समोर आणणे, आता मी याविषयावर बोलत नाही. तुम्ही काळजीपुर्वक सामानाचा अग्रलेख वाचला आणि त्यातून फक्त गोल्डन गॅंग हाच विषय समोर आणला आहे. तुम्ही शोध घ्या, असे आव्हान आहे सर्व पत्रकारांना या गोल्डन गँगचा शोध घ्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक-पवन एक्स्प्रेसचे ४ डबे रुळावरून घसरले, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

Aprna

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा! – अजित पवार

Aprna

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

Aprna