HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्विकारणार?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार तर झाला, मात्र खातेवाटप अद्यापही जाहीर झालेले नाही. त्याचप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचीही उत्सुकता आहे. स्वातंत्र्य दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र पालकमंत्री नेमले नसल्याने त्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल, याबाबत काल आदेश जारी केला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र 15 ऑगस्टला जिल्ह्यामध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? याची चिंता लागून राहिली होती.

पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटलांचं ( Chandrakant Patil) नावदेखील पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असून पुण्यात येत्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जो ध्वजारोहण करेल तो पालकमंत्री असल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने नवीन आदेश काढत चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात ( Kolhapur ) ध्वजारोहण करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे (Pune)  जिल्ह्यात चंद्रकांत पाटलांऐवजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी पुनरागमन होण्याची शक्यता आहे. याआधी फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होते. गिरीश बापट खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यावरुन त्यांच्यावर अनेकदा कोल्हापूरमधून पळून आल्याची टीका केली जाते.

त्यामुळे आता कोल्हापूरचे पालकमंत्री होवून चंद्रकांत पाटील या टीकांना उत्तर देणार का? असा सवाल विचारला जात आहे. दुसऱ्या बाजूला आगामी काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. कोल्हापूरमध्ये भाजपसमोर काँग्रेसचे आणि त्यातही माजी मंत्री सजेत पाटील यांचे तगडे आव्हान आहे. जिल्ह्यात ४ काँग्रेसचे, २ राष्ट्रवादीचे, २ अपक्ष, १ शिवसेना, १ जनसुराज्य असे आमदार आहेत. जिल्ह्यात भाजपचा सध्या एकही आमदार नाही.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे आणि सोलापूरचे पालकमंत्रिपद येणार असल्याच्या चर्चा आहेत. नुकताच राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून खातेवाटप बाकी आहे. तर पावसाळी अधिवेशन संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतिशील करा! – डॉ. नितीन राऊत

Aprna

गॅस दरवाढीवरुन ‘मविआ’चे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी

Aprna