HW News Marathi
महाराष्ट्र

…शपथ देऊनही कार्यकर्ते थांबतील का ?, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

मुंबई | “आता काही पक्षांची अवस्था तर इतकी वाईट झाली आहे की त्या पक्षांकडून, आपण पक्षाची आणि पक्षाध्यक्षाची साथ सोडून जाणार नाही अशी शपथ त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली जात आहे. मात्र, ही शपथ घालून देखील कार्यकर्ते थांबतील का ?”, असा बोचरा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२ ऑगस्ट) वर्धा येथे बोलताना उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून गुरुवारी (१ ऑगस्ट) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाक्षी एकनिष्ठ राहण्याची आणि शरद पवारांची साथ न सोडण्याची शपथ देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होणार

News Desk

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

News Desk

सोलापुरात डेंग्युचा दुसरा बळी

News Desk