HW News Marathi
महाराष्ट्र

योगी, महाराज राजकारणात आल्यावर देशाचे वाटोळे होते; प्रणिती शिंदे भाजपवर टीकास्त्र

मुंबई | “योगी, महाराज यांची जागा ही मठात आहे. ते राजकारणात आले की, देशाचे वाटोळे होते,” असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये एका सभेत केले. सोलापूरच्या सभेत शिंदेंनी केंद्रातील सरकार आणि उत्तर प्रदेशातील विजयावर त्यांनी टीका केली आहे. नुकत्याच देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूक झाल्या आहेत. या पाचही राज्याच्या विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. 

 प्रणिती शिंदे म्हणाल्या, “यूपीच्या निवडणुका आल्या म्हणून शेतीविषयाचे काळे कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिली, ७०० शेतकऱ्यांचा बळी घेतला आणि मग कायदे रद्द केले. लाज वाटायला पाहिजे. आणि देशाला तोडण्याच्या हे लोक घोषणा करतात. योगी, महाराज यांच्याबद्दल आम्हाला मान आहे. पण, त्यांचे स्थान आहे, मंदिर आणि मठात, राजकारणात नाही. ज्या दिवशी राजकारणात योगी आणि महाराज येतात. त्या दिवशी देशाचे वाटोळे सुरू होते. जे काम करतात, त्यांना मतदान करणे महत्वाचे आहे. लोकशाही जिंवत ठेवायची असेल तर कामाला महत्व द्या,” असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 

सोलापूरच्या सभेत प्रणिती शिंदे ऐवढ्यावर थांबल्या नाही. तर त्यांनी सभे पुढे म्हणाल्या,”आपण अजिबात घाबरता कामा नये, आपण कामे केली आहेत. आपल्या देशाला बलिदान कुणी दिले असेल तर ते काँग्रेसने दिले आहे. देशात कसोटीच्या पातळीवर उतरुन काँग्रेसनी कामे केली आहेत, तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता धडाडीने लढताना दिसत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण कामाच्या पातळीवर राजकीय लढा द्यायचा आहे. निवडणुकीत आलेल्या पराभवकडे पाहिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता कोणत्याही निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढण्याची गरज असल्याचे त्या सभेत म्हटल्या. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांची कारकीर्द

News Desk

शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जातोय म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले – नितेश राणे

News Desk