HW News Marathi
मुंबई

आरपीआयचे उमेदवार निलंबित

भाजप आणि रिपाईची युती फक्त मुंबई महापालिकेत झाली असून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पुणे, सोलापूर येथील रिपाइं (ए) च्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून लोणावळा येथे झालेल्या आरपीआयच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांच्याकडून हि घोषणा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई वगळता अन्य ९ महापालिकेत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून आरपीआय आणि भाजप यांच्यात फक्त मुंबई महापालिकेसाठी युती करण्यात आली असून इतर ९ महापालिकेत पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच मुंबई सोडून अन्य ९ महापालिकेत आरपीआयने युतीचा प्रस्ताव भाजपला दिला होता. मात्र भाजपने त्या प्रस्तावावर निर्णय न घेता आरपीआयच्या उमेदवारांना परस्पर कमळ चिन्ह दिले आहे. त्यामुळे आरपीआयची मुंबई वगळता अन्य ९ महापालिकेत भाजपशी युती तोडण्यात आली आहे.

दरम्यान, आरपीआय ने इतर महापालिकेत युती तोडल्यामुळे अनेक जिल्ह्यात याचे गंभीर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तसेच आरपीआयला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवशक्यता असल्याचे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

News Desk

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

News Desk

तृतीय पंथीयांना एक टक्का आरक्षण द्या

News Desk