HW News Marathi
मुंबई

देशात लोकशाही धोक्यात – जावेद अख्तर

पुणे – ‘बोलण्यावर, विचारांवर, अभिव्यक्तीवर बंधने घातली जात आहेत. धर्माआडून सत्ता राबवू पाहणा-यांनी प्रश्न विचारण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र, परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने देशातील लोकशाही धोक्यात आली आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सध्याच्या राजकीय- सामाजिक स्थितीवर आपले मत नोंदविले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध जागराचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या वेळी अख्तर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आमचा आवाज, हाच देशाचा आवाज आहे, असे कोणी म्हणू लागले, तर आपण सावध व्हायला हवे. पाप, पुण्याच्या हिशेबात न अडकता प्रबोधनाची कास धरायला हवी’, असेही ते पुढे म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कँन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा

News Desk

मुंबई पोलिसांमुळेच ‘ती’ सुखरूप घरी पोचली

News Desk

दहावीचा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलला, ३१ मार्चनंतर पेपरची तारीख करणार घोषित

swarit