HW News Marathi
मुंबई

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

– निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार –नवाब मलिक

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत जाहिरातबाजीवर सुमारे 500 कोटी रूपये खर्च केले आहेत. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाकडून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांना जाहिराती देण्यात आल्या आहेत. वास्तविक या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र भाजपने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करुन कायदाचा भंग केला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा ठरवून दिली असताना भाजपाकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या विरोधात आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नवाब मलिक म्हणाले की, भाजपा पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाखांची मर्यादा असताना भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा खर्च भाजपाच्या उमेदवारांवर सम-समान लादून योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यामध्ये 5 वाहनांचा अपघात, एकाचा मृत्यू

News Desk

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, दलितमित्र माधवराव सावंत यांचे निधन

News Desk

तारापोरवाला मत्स्यालयातील आजारी कासवाचे मुंबईकरांना दर्शन

News Desk