HW News Marathi
मुंबई

आम्हांला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित – राज ठाकरे

मुंबई – सधन शेतकऱ्यांना वगळून सरसकट कर्जमाफी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करीत आहे. शेतकऱ्यांच्या बाकीच्या मागण्या मान्य व्हायच्या शिल्लक असल्या तरी ह्या गोष्टीचं स्वागत केलंच पाहिजे. अर्थात आम्हाला “कर्जमाफी” हा शब्द मान्य नसला तरी शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही. आम्हाला संपूर्ण “कर्जमुक्ती” अपेक्षित आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्य-सरकारने त्यांच्या निर्णयाचा तपशील जाहीर करावा कारण ह्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होत आहे ह्यावर लक्ष ठेवतील आणि जिथे जिथे अन्याय होताना दिसेल तिथे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढतील. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या, अंशत: का असेना, सरकारने मान्य केल्या त्याचं स्वागत करतो, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टिकटॉक फेम फैझल शेखसह ४ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Gauri Tilekar

अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk