HW News Marathi
मुंबई

काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

कल्याण: ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला असून त्यामुळे परिसरातील 15 हून अधिक गावातील दळणवळण ठप्प झाले आहे. दरम्यान, प्रशानाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून कल्याण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे परिसरातला दोन दिवसांपासून पाऊस झोडपत आहे. दरम्यान, नाशिकच्या दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे धरण सध्या 71 टक्के भरले त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून खर्चाला कात्री. ३८ निधी केला खर्च

News Desk

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk

मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक – राजकुमार बडोले

News Desk