HW News Marathi
मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज मंडई ऐरोलीत स्थलांतरित करणार नाही !

मुंबई । “छत्रपती शिवाजी महाराज मंडईत मासे विक्री करणाऱ्या कोळी महिला या इथल्या मूळ भूमिपुत्र असून त्यांना ऐरोली येथे स्थलांतरित केले जाणार नाही”, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. क्रॉफर्ड मार्केट समोरील शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील मासळी बाजार ऐरोली येथे हलविला जाणार असल्याची नोटीस येथील कोळी महिलांना पाठविण्यात आली होती. मात्र, आता ही मंडई स्थलांतरित करण्यात येणार नसल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांची या मुद्द्यावर महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत शुक्रवारी (१९ जुलै) एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टॅक समितीचा अहवाल प्राप्त होइपर्यंत या कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा, असा आदेश महापौरांनी दिला आहे. ऐरोलीत स्थलांतरित न करता त्यांना ‘ऐ विभागात’च स्थलांतरित करण्यात यावे, या आशयाचे पत्र महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले होते.

‘ऐ विभागा’त देण्यात येणारे स्थलांतर हे तात्पुरत्या स्वरुपाचेच राहणार असून इथल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना पूर्वीच्या ठिकाणीच जागा देणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk

पुणे डंपरच्या धडकेत युवती ठार

News Desk

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार साईंची शिर्डी

News Desk