HW News Marathi
मुंबई

परेने फुकट्या प्रवाशांकडून केले ८ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल

मुंबई -रेल्वेत मोठया प्रमाणात फुकट्या प्रवाशांची संख्येत वाढ होत आहे.त्यात स्वत:चे आरक्षित तिकीट दुस-याला देणे, विना तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही वाढतच आहे. अशा फुकट्या प्रवाशांविरोधात जून महिन्यात पश्चिम रेल्वेने केलेल्या कारवाईत 1 लाख 95 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातून पश्चिम रेल्वेने 8 कोटी 33 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने जून महिन्यात तिकीट दलाल आणि इतर संशयित व्यक्तीविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यादरम्यान 139 जणांना पकडण्यात आले असून रेल्वेच्या नियमानुसार त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.
12 वर्षांखालील 55 विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडले. तसेच 941 भिकारी व अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे परिसरातून हटवण्यात आले. तर 111 जणांची रेल्वे कायद्याअंतर्गत तुरुंगात रवानगी केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील संगणक परिचालकांचे उपोषण स्थगित

News Desk

#26/11Attack : म्हणून मुंबईला आले फोर्स वन दल

News Desk

स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल

News Desk