HW News Marathi
मुंबई

राज्यातले सरकार नथुरामाच्या विचाराचे: सचिन सावंत

मुंबई हे राम, नथुराम’ या नाटकाविरोधात शांततापूर्ण अहिंसक निदर्शने करणा-या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडू असा इशारा देणारे सरकार नथुरामांच्या विचाराचे असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणा-या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यासाठी काही मंडळीकडून हे राम, नथुराम या नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरु आहेत. रविवारी नागपूरमध्ये होणा-या या नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेस पक्षाने विरोध केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते शांततापूर्ण व अहिंसक पध्दतीने महात्मा गांधी की जय असे नारे देऊन आंदोलन करित होते. परंतु मनात नथुराम असलेल्या सरकारला महात्मा गांधीजींचा जय जयकार ही असह्य होऊ लागलेला आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

विचारांमध्ये नथुराम असल्यानेच सरकारकडून गोळी झाडण्याची धमकी दिली जाऊ शकते असे सावंत म्हणाले. सरकारच्या गृहविभागाने या नाटकाचा प्रयोग यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले असे म्हटले जात आहे. परंतु कितीही सरकारी बळ वापरले आणि राजमान्यतेने समाजमनात नथुरामाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा खादी ग्रामोद्योग विभागाच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधीजींचा फोटो हटवण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात गांधी असल्याने असे प्रयत्न कदापीही यशस्वी होणार नाहीत. हे राम, नथुराम या नाटकाच्या नागपूर येथील फसलेल्या प्रयोगातून आणि प्रेक्षकांच्या नगण्य उपस्थितीतून हे स्पष्ट होते असे सावंत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकलचे चाक रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk

लेडीज चप्पलमधून आणले ३८ किलो सोने

News Desk

नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले

News Desk