HW News Marathi
मुंबई

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड

पुणे- पुण्यातील जनता वसाहतमध्ये रविवारी मध्यरात्री पार्क केलेल्या 27 दुचाकी गाड्या जाळून टाकण्यात आल्या. या घटनेमुळे पुणे परिसरात परिसरात खळबळ उडाली असली तरी अशा घटना वारंवार का घडतात, याचा तपास करणे पोलिसांसाठी जिकरीचे बनले आहे. दरम्यान, विमा कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी काहीजण हा प्रकार करत असावेत, असा एक अंदाज बांधला जात असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्याची मागणी सूज्ञ पुणेकरांनी केली आहे. जनता वसाहत गल्ली क्र. ३८ येथील पोलीस चौकी शेजारील शौचालयाच्या बाजूस मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी येथील रहिवासी आपली वाहने लावतात. रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तेथील एक टेम्पो, २४ दुचाकी आणि दोन सायकली आगीत जळून खाक झाली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील रस्ते लहान असून आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांची एकच धावपळ झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

News Desk

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna

अमित शहांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Aprna