मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी तक्रार रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राष्ट्रगीताचा (National Anthem) अपमान केला होता. यानंतर भाजपचे भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ममता बॅनर्जींविरोधातील ही तक्रार रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (29 मार्च) फेटाळून लावली आहे.
या प्रकरणी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पुढे सुनावणी झाली. ममता बॅनर्जींच्या वतीने वकील माजिद मेमन यांनी बाजू मांडली. ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसून हे संपूर्ण प्रकरण फक्त त्यांची अवहेलना करण्याच्या राजकीय हेतून केल्याचा आरोप त्यांनी न्यायालयात केला. परंतु, या प्रकरणी सत्र न्यायालयाने नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले असून त्यांच्या विरोधामधील प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Bombay High Court today dismissed West Bengal CM Mamata Banerjee's application to quash the complaint against her for allegedly insulting the National anthem during her visit to Mumbai last year.
The complaint was filed against her by BJP leader Vivekanand Gupta. pic.twitter.com/nnVidXn8dh
— ANI (@ANI) March 29, 2023
नेमके काय आहे प्रकरण
मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे मुंबई दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना ममता बॅनर्जी या मध्येच थांबल्या. यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप जपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केला. यानंतर विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत ममता बॅनर्जींच्या विरोधात तक्रार दाखले हीतो. या प्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी न्यायालयाने समन्स देखील बजाविला होता. यानंतर ममता बॅनर्जींना 2 मार्ज 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.