HW News Marathi
मुंबई

पुण्यात चोविस तासाच दोन ठिकाणी गोळीबार

पुणेः जिल्ह्या पुन्हा एकदा टोळीयुद्ध सुरू झाले असून त्यातून खून, प्राणघातक हल्ला, गोळीबार सारख्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड परिसरात दोन दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. त्यानंतर पिंपरी चिंचडव परिसरात चोविस तासात दोन ठिकाणी गोळीबारीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विजय घोलप यांचेजय महाराष्ट्र स्नॅक्स सेंटरनावाचे हॉटेल आहे. ते आज सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले होते. हॉटेल उघडल्यानंतर त्यांचे दैनंदिन काम सुरु असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने बंदुकीतून विजय यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी काल दुपारी साडेतीन वाजता अज्ञात व्यक्तींनी पिंपरीच्या साधू वासवाणी चौकात हॉटेलमध्ये बसलेल्या संतोष कुरावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही आरोपींना गजाआड करण्यास पिंपरी पोलिसांना यश आलेले नाही. ही घटना ताजी असताना भोसरी येथील गवळीमाथा येथे घोलप यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Elections: मुंबई पालिकेसाठी भाजपचा पुढचा प्लॅन काय?

Manasi Devkar

मुंबईतील सभेत ओवैसींवर चप्पल फेकली

News Desk

लाईफलाईन ठरतेय डेथलाईन

Arati More