HW News Marathi
मुंबई

कंत्राटदारांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथील त्रस्त कंत्राटदारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. काही दिवसांपासून आझाद मैदानामध्ये मुंबईतल्या बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे आंदोलन सुरु आहे. अधिकाऱ्यांनी करोडोची कामे करून घेतली पण त्याचे पैसेच दिले नाहीत असा आरोप मोहन हरडे यांनी यावेळी केला.

२००८ पासून मंत्र्यांनी कामे तर करून घेतली पण कामाचे पैसेच दिले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. जवळ जवळ २०० कोटी रुपयांची थकित बिले ही सरकारने दिलीच नाहीत. यामध्ये मंत्र्यांचे बंगले आणि मनोरा निवास याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे कामे करून घेतली पण त्याची बिल आता रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. अनेक वेळा मंत्र्यांची,अधिकाऱ्यांची भेट घेऊन पण तोडगा न निघाल्यामुळे सर्व कंत्राटदारांनी मंत्रालया समोर सामूहिक आत्मदहनाचा सरकारला इशारा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरात महिला गोविंदा दहीहंडीसाठी सज्ज

News Desk

मध्य रेल्वेतील अंबरनाथ-बदलापूर स्थानका दरम्यान रेल्वे रुळाला तडे

News Desk

राणेंची जागा नक्की कुठे – रावसाहेब दानवे सांगतील का?

News Desk