HW News Marathi
मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस…रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई | मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने आज (२८ जून) दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक २० मिनिटे तर धीम्या मार्गावरील वाहतूक १५ मिनिटे उशीराने सुरू आहे.तसेच हार्बर मार्गावर वाहतूक १० त१५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशीराने धावत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी भरण्यास सुरुवात झाली असून मुंबईच्या सखल भागात देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. बोरिवली, जोगेश्वरी, मालाड आणि अंधेरी भागात जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड आणि कांजुर मार्गदरम्यान जोरदार पाऊस पडला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लाग रागा लागल्या आहेत. कल्याणच्या चिकणघर परिसरात पाणी साचले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम रेल्वेकडे सहा नवी सेगवे वाहने, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

News Desk

राज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित

News Desk

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

News Desk