HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चात मुंबईकर जाती भेद विसरुन मदतीस आले

मुंबई | शेतकऱ्यांनी लाँग मार्च मोर्चातून सरकार विरोधात यल्गार पुकारला होता. गेली आठवडाभर ४० हजार शेतकरी नाशिकहून २०० कि.मीचा पायी प्रवास करत अगदी शीस्तबद्ध पद्धतीने प्रवास करत मुंबईत दाखल झाला होता.

त्यांच्या शीस्तबद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे हा मोर्चा रविवारी मुंबईतील सोमय्या मैदानात पोहचला होता. या ठिकाणी विश्रांती घेऊन सकाळी आझाद मैदानाच्या दिशेने जावू शकले असते. पण सोमवारी १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचा कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी शेतऱ्यांनी एका क्षणाची विश्रांती न करतात. रात्री आझाद मैदानाच्या दिशेने पायी चालत गेले. आणि पहाटे पाच वाजता आझाद मैदानात दाखल झाले.

तसेच या शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चा जेव्हा मुंबईत दाखल झाला. तेव्हा मुंबईकरांनी देखील खुल्या मनाने त्यांचे स्वागत केले. कोणत्याही जातीभेद न पाहता शेतकऱ्यांच्या मदततील धावून आले. या शेतकऱ्यांच्या भोजणाची सोय करण्यासाठी मुंबईकर पुढे सरसावले होते. सतत धावत असलेली मुंबई ही शेतकऱ्यांसाठी थोडा वेळ का होऊ ना थांबून शेतकऱ्यांनाच्या मदतीला धावून आली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk

‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, सामनातून भाजपावर टीका

News Desk

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk