HW News Marathi
मुंबई

सुनंदा पुष्कर प्रकरणात सुब्रम्हण्यन स्वामींची याचिका फेटाळली

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकाची नियुक्ती (एसआयटी) करावी, अशी मागणी करणारी याचिका सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केली होती. ६ जुलै रोजी ही याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, याप्रकरणी विशेष तपास पथक नेमावे आणि त्यावर कोर्टाने नजर ठेवावी, असेही या याचिकेत म्हटले होते.

स्वामी यांनी दाखल केलेली याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. गुरूवारी झालेल्या सुनावणीत तुमच्याकडे इतकी सगळी माहिती कशी आली?, तुम्ही पोलीस तपासावर प्रश्न कसा काय उपस्थित करत आहात? तुमच्याकडे सुनंदा पुष्कर प्रकरणातले काही पुरावे होते तर ते आधी सादर का केले नाहीत? असे प्रश्न दिल्ली हायकोर्टाने सुब्रमण्यम स्वामींना विचारले. तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आरोप करू शकत नाही. सुनंदा पुष्कर प्रकरणात तुम्ही तपास यंत्रणांना कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तुमच्याकडे या प्रकरणातली थोडीशी माहिती होती तर ती पोलिसांना देणे तुम्हाला योग्य वाटले नाही का? तुम्ही दाखल केलेल्या याचिकेचा आधार काय? जनहित याचिकेला राजकीय हिताच्या याचिकेचे स्वरूप कसे दिले जाते, त्याचे हे उदाहरण आहे, असे सांगत न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळून लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अखेर पत्रकारांची दिलगीरी व्यक्त केली

News Desk

गुढीवाडव्याच्या मुर्हूतावर राज्यभरात प्लास्टिक बंदी

News Desk

बातमीचा इम्पॅक्ट | धारावीचा शेटवाडी नाला झाला साफ

swarit