HW News Marathi
मुंबई

कर्जमाफीच्या गोंधळाला सरकार नाही तर पत्रकार जबाबदार – सहकार मंत्र्यांचा अजब तर्क

मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत गोंधळ झाल्याचे समोर आले होते. एकाच अधारकार्ड नंबर वर शेकडो शेतकऱ्यांची खाती असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करून बँकर्स बरोबर बैठकही केली होती. त्यानंतर सहकार मंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीच्या गोंधळाला बँका जबाबदार असल्याचे सांगितले होते. शिवाय कर्जमाफीसाठी सरकारने थोडी घाई केल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. मात्र त्यांनी आज घुमजाव करत कर्जमाफीच्या गोंधळाला सरकार नाही तर पत्रकारच जबाबदार आहेत असा अजब तर्क काढला आहे. कर्जमाफी बाबात गोंधळ आमचा नाही तर गोंधळ तुमचाच झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मंत्रालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारां बरोबर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. कर्जमाफीची व्यवस्थित छाननी होत आहे. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीत जसे गैरव्यवहार झाले तसे होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून काम केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील ७६ लाख खातेदारांची तपासणी करायची असल्याची माहिती ही त्यांनी दिला. व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणून वेळ लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जवळपास एक लाख एक हजाराची ग्रीन लिस्टची यादी तयार झालेली आहे. आयसीआयसी बँकेतून खातेदारांच्या बँकेला ६७१ कोटी रुपयांची रक्कमेचे आत्तापर्यंत वाटप झाल्याचा दावा त्यांनी केलाय. संबंधित बँकांनी आता तपासणी करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

News Desk

खाजगी विद्यापीठातही मागासवर्गीय विद्यार्थ्याना फी प्रतिपूर्ती द्या

News Desk

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

swarit